Free for download only on 4th and 5th March 2020

Sunday, 3 September 2023

अशी ही दादी, आणि असाच मी.

 


Alter ego या शब्दाचा मराठीत अर्थ सांगणे अवघडच. गुगल केले तर त्याने एक प्राण दोन शरीर असे मराठीत सांगितले. Alter ego म्हणजे हुबेहूब तुमची कॉपी म्हणता येईल. म्हणजे दिसण्यात नाही तर आवडी-निवडी, स्वभाव, react व्हायची पद्धत या बाबत.



माझा alter ego कोण म्हणाल तर badhai ho मधील दादी. कायम खरं बोलणारी. संबंध टिकावे म्हणून खोटे खोटे formal न बोलणारी. नात लग्न होऊन जाताना जेव्हा तिला म्हणते की आजी मी तुला परदेशात गेल्यावर फोन करेन, तेव्हा तिला भारतात असताना फोन करून काय उजेड पाडलास जे आता परदेशात गेल्यावर फोन करशील, असे तिथल्या तिथे सुनावणारी. बिचारा तिचा मुलगा band वाल्यांना band वाजवायला लाऊन विषय तिथेच संपवतो.



लग्न घरात, वातावरण बिघडेल हे माहित असून ही स्वतः च्या मुलीला व सुनेला दुसऱ्या सुनेच्या गरोदरपणाबद्दल टोमणे मारल्याबद्दल, लग्न झाल्यावर मुले होणारच, मुले काय सेक्स केल्याशिवाय आकाशातून पडतात का, पती पत्नीचे संबध काय चुकीचे आहेत का, असे विचारणारी. संस्काराची भाषा करणाऱ्या तुम्ही तरी तुमचे कर्तव्य कुठे पार पाडले, असे सुनावणारी. ती हे सुनवत असताना गरोदर सून बाहेर जाऊन नवऱ्याला 'अम्माजी फट पडी है.’ असे सांगून बोलावते. खरोखरच मी ही फट पडल्यावर अशीच आफत येत असणार माझ्या आजू बाजूच्या लोकांवर. पण नाते शाबूत ठेवायचे म्हणून काहीही ऐकायचे का, आणि नाते खरोखरच पक्के असेल तर खरे बोलले तर एवढे का लागावे? का बोललेले खरे असते म्हणूनच लागते?



पन्नाशीला आलेला मुलगा आता पुन्हा बाप बनणार आहे असे समजल्यावर त्यालाही दादी सुनावते. मी तर मागच्या पिढीची तरीही मला माहित आहे. पेपर मध्ये येते, टीव्ही वर सांगतात निरोध वापरा, तरी तुला हे कसे कळाले नाही. आणि हे सगळे करायला तुला वेळ कधी मिळाला. मी जरा माझ्या जवळ बस, बोल असे म्हणायचे तेव्हा तर म्हणायचास आज फार थकलो आहे. आणि हे करायला मात्र तुला बरा वेळ मिळाला.



एवढ्यावर न थांबता ती त्याला शेवटी तू तुझ्या बापाचाच मुलगा, असे ही म्हणते. आता काही लोकांना हे जरा अतीही वाटेल. पण ती आहे ही अशी.



दुसऱ्या एका प्रसंगात ती तिच्या मेलेल्या नवऱ्याचा उल्लेख करताना आधी परमेश्वर त्याच्या आत्म्याला शांती देवो असे म्हणते तर दुसऱ्याच वाक्याला त्या माणसाने एक शहाणपणाचे काम नाही केले आयुष्यात असेही म्हणते. पण तिला न सांगता करून आणलेल्या सुनेमुळे तिच्या म्हातारपणाची सोय झाली, परमात्म्याने त्याला सद्बुद्धी दिल्यामुळे एवढी चांगली सून आणली, असे म्हणून ती नवऱ्याच्या निर्णयाचे आणि सुनेचे कौतुक ही करते.



दादी मुळे अनेक संबध दुरावले असतीलही. आत्ता गप्प बसली असती दादी तर काय बिघडले असते. पण ती बसत नाही गप्प(आणि मी ही).



बरं ती बोलते ते चुकीचे ही नाही ना? ती काही कुणाला शिव्या शाप देत नाही. आहेत ती तथ्ये, आहे तशी ती मांडते. दुसरा जिथे बरोबर होता, तिथे ती चूकहोती आणि तो बरोबर असे मोठ्या मनाने कबूलही करते. तर अशी ही दादी, आणि असाच मी. तुमचा alter ego कोण आहे? #maheshwrites #marathi

Sunday, 27 August 2023

जगन्माता

 

जगन्माता कधी काय कसे धडे देईल काही सांगता येत नाही. एक फारशी न आवडणारी व्यक्ती, फारशी पेक्षा न आवडणारीची खरी. आता ह्या व्यक्तीशी काहीही संबंध ठेवायचा नाही, असे ठरवले.

पण म्हटले ना नियतीचे फासे वेगळेच पडतात. एक कमिटी गठीत झाली. त्यात आम्ही दोघेच. सोबत काम करणे ओघाने आलेच. तरी ठरवले, फार क्लेश न करून घेता, एकत्र काम करायचे. आता गुण, दुर्गुण सगळेच माहित आहेत. पूर्वी एवढा धक्का नाही बसणार. सगळं छान पार पडलं. त्रास झाला नाही मनाला. कर्तव्य चोख पार पडले.

नंतर आम्ही पुन्हा एकदा एका प्रवासात भेटलो. शेजारी, शेजारी सीट्स. लांबचा प्रवास. बोलणे ओघाने आलेच. फारसे सख्य नसले तरी, आता सोबत न धुसफुसता राहता येत होते.

तुला एक सांगतो,’ ती व्यक्ती म्हणाली, ‘बऱ्याच वर्षापूर्वी मी एका साधुनां भेटलो. म्हणालो थोडा सत्संग करा. तर त्यांनी मला माझा पेशा विचारला. मी वकिली असे सांगितल्यावर ते म्हणाले, तुमच्या कडे नेहमी जगातील असेल नसेल ते सारे दुःख घेवून लोक येतात. त्यांचे ऐका, पण त्यात गुंतू नका. ऐकताना मनातून त्यांचे सगळे छान होईल अशा शुभ भावना पाठवा. खूप महत्वाचे आहे हे, तुझ्यासाठी.’

आपण समोरच्याचे वाईट गुण पाहत बसलो, की नकळत आपल्यात ही तेच उतरतात. चांगले पहिले, की चांगले गुण उतरतात.’

मी महामायेला प्रणाम केला. ती किती संदेश देत असते आपल्याला. कुणा, कुणाच्या मुखातून. आपण फक्त ते ग्रहण करायला receptive राहायचे. जगातील चरचर भगवंताने भरलेला आहे. माझ्या नावडत्या व्यक्तीतही तो आहे. भांडल्याभांडे लागायचेच. पण कधी कधी दुसरे भांडेही असे बरेच काही शिकवून जाते. त्या क्षणी उरसुरल्या भिंतीही गळून पडतात. उरते ती केवळ माझी जगन्माता.

#maheshwrites

Monday, 12 June 2023

चार्ली परत येतो

 


हिमालयातून आल्यापासून खूप शांत वाटत आहे. अस्वस्थता दूर झाली. पण मला आज त्या अस्वस्थेची पण आठवण येते आहे. गेल्या काही महिन्यापूर्वी मी अस्वस्थ होतो प्रचंड. सगळीच अनिश्चितता होती. त्या मनस्थितीत मी 'चार्ली परत येतो.’ ही कथा लिहिली. संपादकांकडून खूप वाह वाह मिळाली त्या कथे मुळे. आजच्या माझ्या शांत, समाधानी मनोवृत्तीत मी लिहू शकलो असतो का 'चार्ली परत येतो' सारखी कथा? नाही, नक्कीच नाही. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावरती आपल्या प्रगतीसाठी, विकासासाठी जे आवश्यक असते ते आणि फक्त तेच मिळत असते. मग ते सुखदायी असेलही नसेलही. उद्विग्न मनस्थितीत तळ्याकाठी बसून 'चार्ली परत येतो' लिहिणे ही माझ्या आयुष्यातील सुंदर आठवणीपैकी एक आहे.



गोष्टी सोडून द्यायला शिका.’ असे आपण अनेक वेळा सांगतो ऐकतो. पण आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असे लोक, प्रसंग असतात की ज्यांनी आपल्याला धरून ठेवलेले असते. कितीही सोडायचे म्हटले तर सुटतच नाही आणि मनाला त्रास होतो. हिमालयात जाऊन आल्यावर मात्र सगळे आपसूक सुटाय ला लागले, गळायला लागले.


अलीकडेच माझा एक मित्र बदली होऊन माझ्या गावी आला. आमच्या आणखीन एका मित्राने त्याला सांगितले की महेश कडून तुला खूप काही शिकायला मिळेल. जेव्हा मला त्याने त्या बाबत सांगितले तेव्हा खूप हसू आले. गुरु बनण्या बाबत श्री रामकृष्ण परमहंस म्हणतात.

The profession of a teacher is like that of a prostitute. It is the selling of oneself for the trifle of money, honour and creature comforts. For such insignificant things it is not good to prostitute the body, mind and the soul, the means by which one can attain God. A man once said about a certain woman: ‘Ah! She is having a grand time now. She is so well off! She has rented a room and furnished it with a couch, a mat, pillows and man other things. And how many people she controls! They are always visiting her.’ In other words, the woman has now become a prostitute. Therefore her happiness is unbounded. Formerly, she was a maidservant in a gentleman’s house; now she is a prostitute. She has ruined herself for a mere trifle.

जेव्हा जेव्हा कुणी तरी मला म्हणते की तूच माझा गुरु आहेस, तेव्हा ठाकुरांचे वरील शब्द मला आठवतात.



सध्या जुबिली ही वेब सिरीज पाहत आहे. तीन भाग झाले पाहून. देविकारानी बॉम्बे टाकीज, राज कपूर, नर्गिस यांच्या जवळ जाणारी पात्रे पहिली. फाळणी आणि फिल्म इंडस्ट्री यांची मीण घालणे जरा नाही चांगलेच अवघड आहे. आता पर्यंत फाळणी खुशवंत सिंग, अमृता प्रीतम, मन्तो अशा लाडक्या लेखकांच्या मार्फत अनुभवलेली, त्याची आतडे पिळवटून टाकणारी दाहकता लेखणीतून हृदयापर्यंत पोचलेली. तिचे असे उथळ व वरवरचे चित्रण पचवणे जरा जडच गेले. फाळणी झाली म्हणून तवायफ असलेली नायिका लखनऊ वरून मुंबईला का येते, आणि अगदी modern, तोकडे कपडे घालून एकटीच क्लब मध्ये नाचायला जाते हे ही अवघड. तवायफ आणि वेश्या यात फरक आहे. तवायफ या अतिशय सुसंस्कृत व बुद्धिमान असत. चांगल्या घरातील मुलींना त्यांच्या कडे आजच्या भाषेतले ग्रूमिंग lessons घ्यायला पाठवले जायचे. बहुंतांश जणी गाणी रेकॉर्ड करणे आणि नंतरच्या काळात सिनेमात काम करणे चांगले काम समजायच्या नाहीत आणि म्हणून त्यास त्यांचा विरोध असायचा. त्या एखाद्या धनिकाचा आधार घेऊन निश्चित राहत, पण त्याच्याशी एखाद्या पतिव्रता स्त्री इतक्या प्रामाणिक राहत. त्या देहविक्रेत्या नक्कीच नव्हत्या.



सानिया कधीच disappoint करत नाही. तीन मैत्रिणीची कथा, त्यातली एक लेस्बिअन म्हटल्यावर वाटले की आपली आवडती लेखिका formula वापरून पल्प फिक्शन तर नाही लिहायला लागली. पण पुस्तक वाचल्यावर काही तरी छान वाचल्याचा आनंद नक्कीच मिळाला. नसेल ती स्थलांतर इतकी सुरेख, पण निश्चितच छान.



माझ्या आवडत्या लेखकांची पुस्तके मी परत परत वाचतो. नावेच सांगायची झाली आवडत्या लेखकांची तर खुशवंत सिंग, शरदचंद्र, अरुंधती रॉय, सानिया, के आर मीरा, पेरूमल मुरगन, शशी देशपांडे, आर के नारायण, अनिल अवचट. मागच्या महिन्यात दिल्लीला जाऊन आलो. माझा पक्का दिल्ली वाला मित्र राहुल याने मला दिल्ली टूर मध्ये न दाखवली जाणारी काही ठिकाणे दाखवली जसे की हौज खास किल्ला. आता पर्यंत केवळ पुस्तकातच ज्या बद्दल वाचले होते त्या हुमायुन्स टुंब आणि लोधी गार्डनलाही भेट दिल्ली. मग काय? परत आल्यावर खुशवंत सिंगांची कादंबरी दिल्ली घेतली तिसऱ्यांदा वाचायला आणि हरवलो भागमतीच्या आयुष्यात आणि दिल्लीच्या इतिहासात. लेखक आणि त्याची कुरूप तृतीय पंथी मैत्रीण भागमती ह्यांची ही प्रेमकहाणी दिल्लीचा इतिहास ही सांगून जाते. ही कादंबरी लिहायला त्यांना पंचवीस वर्षे लागले. कादंबरीतील काही काही प्रसंग वाचताना मजा येते. जसे की लेखक व भागमती दिल्लीच्या पुरातन वास्तूंना भेट द्यायला निघतात तेव्हा थर्मास मध्ये कॉफी भरून घेऊन जात असतात. त्या काळी असे बाहेर चहा कॉफीचे stall नसायचे. घरातूनच चहा कॉफी थर्मास मध्ये भरून न्यायची. आज किती गम्मत वाटते ना हे वाचताना? बाहेर जाताना चहा कॉफी सुद्धा न्यायचे म्हणजे जरा अतीच, माझ्या पिढीच्या विचारा पलीकडले? आणि ते गरम राहत असेल का त्या थर्मास मध्ये? कदाचित सिंग साहेबांनी परदेशातून आणला असेल खास थर्मास.



निवाला तिच्या मैत्रिणीकडे खेळायला सोडले आणि मी माझ्या मित्राकडे गप्पा मारायला निघून गेलो. घरी आल्यावर निवाने मला सांगितले की परीचे आजोबा वारले. त्यांचा फोटो लावला होता. त्याला हार घातला होतो. मृत्युची अशी तिला सहज सोपी झालेली ओळख मला आवडली. नाही तर आम्ही लहान असताना कुणी वारले तर लहान मुलांना तेथून दूर ठेवण्यासाठी केवढा आटा-पीटा केला जायचा. खरेच We all are born intelligent, but education spoils us.



Saturday, 3 June 2023

सुरवात Suruvat

या महिन्यात चाळीस वर्षे पूर्ण होतील मला. त्या निमिताने काही लिहायला घेतले होते. पण मग मनात कल्पना आली की आपण एक साप्ताहिक blog का लिहू नये. मी काय वाचतो आहे, काय करतो आहे हे का share करू नये? त्या मुळे कुणाला काही नवीन इनसाइट्स मिळत असतील तर चांगलेच आहे की! नाही तरी चाळीशी नंतर आता आपण जमा केलेले अनुभवाचे शंख शिंपले मुक्त पणे वाटायलाच हवेत.



दोन आठवडे मस्त हिमालयात राहून आलो. भर उन्हाळ्यात तिथे काय थंडी. मे महिन्यात स्वेटर टोपी घालण्याची मजाच निराळी. आता इथे येऊन घामाच्या धारा. तरीही मन रेंगाळतेय हिमालयात. परत जाण्याची ओढ लागली आहे. सप्टेंबरमध्ये जाऊ का ऑक्टोबरमध्ये याचे ठोकताळे बांधणे चालू आहे. असे काय मिळाले मला हिमालयात? नेहमीच्या ट्रिप पेक्षा ही सहल कशी वेगळी होती? शब्दात सांगणे अवघडच. पण शोध संपला, समाधान लाभले असे मात्र नक्की सांगेन.



लेखन जीव की प्राण. आतून स्पुरते आणि बोटातून उतरते, फार काही विचार नाही, planning वगैरे तर अजिबातच नाही. दिल की बातो मे planning काम नाही करती. मराठीत एवढे लिहीन, चांगले लिहीन, वेगळे लिहीन - कधी विचारही केला नव्हता. माझा एक मित्र आहे दिल्लीत. त्याचे नाव अमोल. तर ह्या अमोलचे एक पेटंट वाक्य आहे , ‘let things happen organically.’ मलाही पटते आहे ही philosophy. आयुष्यात आपण हात धुवून एखाद्या गोष्टीच्या मागे धावतो आणि कधी ध्यानी मनीही नसलेल्या गोष्टी अगदी अलगद कवेत येऊन जातात.



तर सध्या काय वाचत आहे माझी आवडती लेखिका सानिया हिचे आवर्तन पुन्हा वाचायला घेतले. आठवड्याच्या मध्येच तिचेच नवे पुस्तक निरंतर वाटेवर टपालाने आले. काय मस्त लिहिते ही बाई. आणि हे मी त्या माझ्याच गावच्या आहेत म्हणून तर अजिबात म्हणत नाही. पण माझ्या आवडत्या लेखिकेत आणि माझ्यात बरेच काही सामान आहे, ही भावना नक्कीच सुखावणारी आहे.



शनिवार, रविवार लोकसत्ता वाचणे म्हणजे तर पर्वणीच. सध्याच्या घडीला सगळ्यात शुद्ध मराठी भाषा वापरणारा एकमेव पेपर आहे हा. आपली भाषा किती समृद्ध आहे याची पदोपदी जाणीव होते वाचताना. शिवाय लेखही अभ्यासपूर्ण, विविधांगी. आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त मराठीत लिहायला, वाचायला बोलायला हवे.


इंग्लिश मध्ये माझा आवडता पेपर खरे तर हिंदुस्तान टाईम्स. (मी त्यात लिहिले आहे म्हणून नाही) पण मुंबई पुण्याबाहेर तो मिळत नाही. इंडिअन एक्स्प्रेस ही छानच. आता त्यांनी पाने कमी केली हीच एक तक्रार. त्यांच्या अनेक जुन्या पुरवण्या, कात्रणे मी जपून ठेवली आहेत. दर बदलीला त्याचे sorting करून जड अंतकरणाने काही अंक दूर करावे लागतात. पण संपूर्ण संग्रह टाकून देण्याचे मात्र माझे धारिष्ट्य कधीच जाहले नाही.


बरं, नवीन फोन घ्यायचा आहे. मोठा display हवा, 128GB ram हवा आणि २५ हजार पेक्षा महाग नको. काय म्हणता कोणता घेऊ?


Sunday, 19 February 2023

jatra fair

 

हर्नियाचे ऑपरेशन झाल्यामुळे गेले सोळा दिवस मी घरीच. आज गावची जत्रा.

सगळे चालले आहेत जत्रेला.’ निवा म्हणाली.

आपणही जाऊ.’ मी म्हणालो.

पण तुझा हर्निया.’

हळू गाडी चालवू.’

नकोच.’

अगं, जाऊ. उद्या पासून ऑफिसलाही जाणार आहे.’

फोर व्हीलर.’

नाही. टूव्हीलर. फोर व्हीलर नाही चालवायची अजून काही दिवस. आजी घरी थांबेल. आपण तिघे जाऊ.’

 

 

शहरात मॉल मध्ये कायमच चकचकीत जत्रा. ती तिने पाहिलेली. गावची जत्रा चकचकीत नाही, पण जास्त रंगीत, जास्त रसरशीत. कळत्या वयातली तिची ही पहिलीच जत्रा. अख्ख्या आयुष्यात आकाश पाळण्यात बसली नव्हती त्यामुळे त्यात बसण्याची उत्सुकताही.

तू ही बस.’ म्हणाली.

आताच ऑपरेशन झाले आहे. नको. आई बसेल तुझ्या बरोबर.’ मी म्हणालो.

निवाचा पाळणा वर गेला. मी खाली उभारलेलो. ती मला वरून टाटा करत होती. मी हात हलवला. मला जास्त वेळ उभारवत नव्हते. पण बसायला कुठेच जागा नाही. आयुष्याच्या जत्रेत माझा पाळणा आता सगळ्यात उंच होता. इथून आता उतरणीला लागणार. निवाचा पाळणा आता कुठे वर जायला लागला होता. आईचा पाळणा वरून खाली यायला लागला होता म्हणून ती घरी. आणखी वीस वर्षांनी मी घरी बसेन, निवा तिच्या मुलांना जत्रेत घेऊन येईल.

आकाश पाळण्या नंतर मग मेरी गो राउंड, मग जम्पिंग. तिचे मन भरेना आणि मला उभे राहवेना. मग बर्फाचा गोळा. आयुष्यात आईस्क्रीम तिने अनेक वेळा खाल्ले होते पण गोळा पहिल्यांदाच. कर्कश आवाजाचा भोंगा. तिच्या जीवन अनुभवाची सुरुवात होती आणि मी तिला जे जे हवे होते ते सगळे घेऊन देत होतो.

हे असलं कशाला घेऊन द्यायचे. आधीच मला आताशा कमी ऐकू येते. ‘ आई घरी आल्यावर म्हणाली.

सगळं नवीन आहे तिच्यासाठी. तुझं संपत आलंय, माझं आता आटत जाणार आहे, पण तिची तर सुरुवात आहे. जगण्याचा रसरशीत अनुभवच महत्वाचा असतो. सोनं चांदी किती घातले अंगावर हे नाही आठवणार तिला मोठे झाल्यावर. पण ह्या छोट्या छोट्या आठवणी तिला आयुष्यभर पुरतील. शिवाय मी आहे तोवर सगळी गम्मत. लहानपण आई वडील जिवंत असे पर्यंतच तर असते. ‘ #365daysofselflove #life #marathi #fair #village

Saturday, 29 October 2022

माझ्या दोन बाल मैत्रिणी

माझ्या दोन बाल मैत्रिणी. अगदी शाळेत ही जात नव्हतो तेंव्हा पासून आम्ही खेळायचो. घरे ही अगदी जवळ जवळ. लहानपणी तासंतास सोबत खेळलेलो आम्ही. मग शाळा वेगळ्या झाल्या, भेटी कमी होऊ लागल्या. आम्ही पुन्हा अकरावी, बारावीत एकत्र आलो. आता मैत्री तर दूर साधे बोलायच्या पण नाहीत. बारावी नंतर पुन्हा दुरावलो. मग पुन्हा कॉलेज मध्ये असताना भेट झाली आमची अगदी अनपेक्षित. मी आणि माझी कॉलेज मधील मैत्रीण (x म्हणू तिला) एक सिनेमा बघायला गेलो. आमच्या सीट्स शेजारीच माझ्या त्या दोन मैत्रिणी आणि अकरावी बारावीतल्या मुलींचा ग्रुप होता. मी बोललो माझ्या मैत्रिणीशी. पण त्यांचा रेस्पोंस एकदम थंड. x मला म्हणाली तुझ्या बाल मैत्रिणी तर बोलत देखील नाहीत तुझ्याशी. माझे वय तेंव्हा १८ होते. जरा गोंधळलेलाच होतो मी. रूढार्थाने यशस्वी होतो तरी. कदाचित माझ्या बावळ्यापणा मुळे चार चौघात लहानपणीचा मित्र म्हणून मला acknowledge करायची भीती वाटली असेल का माझ्या त्या मैत्रिणींना. आज मला इतक्या वर्षांनी त्या परत कुठे भेटल्या तर तश्याच वागतील का? का आता झाल्या असतील शहाण्या? का माझे आता त्यांच्याशी वागणे बदलेल. माहित नाही. पण यश, दिसणे, पैसा, प्रतिष्ठा, आणि समाजाने घालून दिलेल्या त्यांच्या व्याख्येत बसणे खरेच इतके महत्वाचे असते का? आणखी एका कॉलेज मधल्या मित्राने मला परवा सहज मला किती पगार विचारले. मी ही खरा आकडा सांगितला. ‘म्हणजे तू जीवनात यशस्वी ठरलास.’ तो म्हणाला. हो पैसा जगण्यासाठी आवश्यक आहेच. पण अमुक एक रक्कम कमावली कि यशस्वी नाहीतर अयशस्वी हा काय प्रकार? होय मी लिखाण, अध्यात्म यात यशस्वी आहे. बाकी बऱ्याच गोष्टीबाबत अजून गोंधळलेलाच आहे. आपण सगळेच असतो असे. पण म्हणून यशस्वी आणि अयशस्वी असे tags लावून एखाद्या ढिगातून कोवळ्या भेंड्या उचाल्रून घेवून, जून भाजी आपण reject करतो तसे माणसांनाही करायचे? #365daysofselflove

Monday, 19 September 2022

Sat Varshe Sakt Majuri...? सात वर्षे सक्तमजुरी Book Review

 


Dr. Sherali Shaikh's Marathi book titled 'Sat Varshe Sakt Majuri...?' is an interesting read for sure. This autobiographical book primarily focuses on the seven years which he spent in the hinterlands of Nandurbar.

The book begins with the authors transfer to a remote location posting, and his attempts, albeit unsucessful, in getting it changed. Reluctantly he joins the posting. The challenges are multiple. The transport options are limited. There is no separate residential facility. The staff huddles up in the godown like structure of the health centre. Electricity is unheard of. The dialect which most of the staff and all the patients speak is Greek and Latin for the author.  Yet, he overcomes all these challenges and becomes a sought after surgeon in the district. Through out the book the author tries to analyse whether this remote posting was a blessing or a punishment.

A class one gazetted posting appears to be a plump position for the world. But the picture isn't rosy. The author is denied a rented house for his religion. There is constant uncertainty coupled with a regret of having made a wrong choice of becoming a medical officer. The author has been very honest in wording all these human emotions.

He describes how he completed his education in adverse circumstances. He says that the adolescent age is very challenging for every person, no matter if he is good at studies or not. I feel this is the kind of sensitivity required for dealing with persons of this age group.  I wish more was written about this part of his life, particularly how he acquired a command over the English language.

The author was selected to be a part of the medical team to be deputed to Haj to treat the Indian pilgrims. This forms the most interesting part of the book, and is a treat to read.

We all know that the full form of M.B.B.S is Bachelor of Medicine and Surgery. But how many M.B.B.S doctors we know conduct surgeries? The book underlines this dearth of surgeons in the rural parts of the country. Rather it tells us that there are qualified surgeons but for some unknown reasons they do not conduct surgeries. I wish the author had described in short the procedure of surgery. It would have helped in knowing how at times thirty surgeries were carried out in a day. Also, he should have told as to how there is so much of awareness about family planning in the most underdeveloped parts of the state.

What I liked about the book is that the author comes across as a simple person and not a superhero. As a result neither he, nor his book is error free. I did not like the way he has glorified drinking and eating gutka. Mere reference to these habits is one thing and glorifying them is another. At one place he even refers to drinking as national programme. Also he laughs at the trans person who in a very dignified way comes to say him off. This is cruel and insensitive. Not at all expected from a member of medical fraternity.  

Yet, the book is an interesting read. It is enjoyable, and at the same time throws light on the system, something which doesn't always happen. The book is highly recommended.